२२ एप्रिल हा दिवस खूप भयंकर होता, या दिवशी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बायसरन व्हॅली, पाहलगाम (Kashmir Attack News In Marathi) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि एवढेच नव्हे तर २० हून अधिक लोक जखमी झाले. हि घटना अंगावर काटा आणण्यासारखी आहे.
हल्ल्याची घटना
अनुक्रमणिका
या हल्ल्याची सुरुवात दुपारी सुमारे २:५० वाजता होते, चार ते सहा दहशतवाद्यांनी लष्करी पोशाखात बायसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर गोळीबार सुरु केला. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात M4 कार्बाईन आणि AK-47 रायफल्सचा वापर केला. तसेच हल्लेखोरांनी पीडितांना ‘कलमा’ म्हणण्यास सांगितले आणि मुस्लीम ओळख पटवण्यासाठी सुंता तपासली गेली.
हल्ल्याचे कारण
२०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, भारत सरकारने बाह्य व्यक्तींना काश्मीरमध्ये वसाहत करण्यास परवानगी दिली. या निर्णयामुळे स्थानिक लोकसंख्येत असंतोष वाढला. यामुळे TRF या दहशतवादी संघटनेने या ‘जनसांख्यिकीय बदलां’चा विरोध म्हणून हा हल्ला केला असे म्हटले जात आहे.
सरकारी प्रतिक्रिया
या हल्ल्या नंतर भारत शांत बसणाऱ्या मधले नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील दौरा लवकर संपवून भारतात परत येत हल्ल्याचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन लोकांना दिली आहे. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्याला ‘भ्याड कृत्य’ असे म्हटले आहे. गृह मंत्री अमित शाह यांनी श्रीनगरला भेट देऊन सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर जागतिक नेत्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि भारताला पाठिंबा दिला आहे.
तपास आणि सुरक्षा उपाय
मित्रांनो, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सुरक्षा यंत्रणांनी तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी केले असून, त्यापैकी दोन परदेशी असल्याचा संशय देखील आला आहे. सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद या लष्कर-ए-तोयबा कमांडरला हल्ल्याचा मास्टरमाइंड मानले जात आहे.
स्थानिक मदत
तुम्हाला माहिती का? हल्ल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी धैर्य दाखवत अनेक पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याची उत्तम कामगिरी केली आहे. स्थानिक पोनीवाल्यांनी ११ जखमी पर्यटकांना पोनी आणि तात्पुरत्या स्ट्रेचरच्या मदतीने बाहेर काढले. एक स्थानिक दुकानदाराने छत्तीसगडच्या चार कुटुंबांना सुरक्षा सुद्धा दिली. तसेच महाराष्ट्रातील एका कुटुंबाने स्थानिक टॅक्सी चालकाचे आभार मानले, ज्याने त्यांना आपल्या घरी आश्रय दिला.
मित्रांनो, पाहलगाम हल्ला केवळ एक दहशतवादी कृत्य नसून, तो काश्मीरमधील स्थिरतेच्या प्रयत्नांवर मोठा आघात असे हि आपण म्हणू शकतो. या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली असून, सरकार आणि सुरक्षा यंत्रणांवर दबाव दिला जात आहे.
हे पण वाचा: पाहलगाम मध्ये काय घडलं नेमकं?